पोस्ट्स

सिक्कीमच्या भारत प्रवेशाची थरारक कहाणी, १६ मे १९७५ ला सिक्कीम स्थापना दिवस

इमेज
भारत १९४७ साली स्वतंत्र झाला; परंतु सर्व राज्ये, संस्थाने त्यावेळी भारतात सामील झाली नाहीत. जम्मू काश्मीर, हैदराबाद, त्रावणकोर यासारख्या राज्यांना स्वतंत्र देश व्हायचे होते. भोपाळ, जुनागढ इत्यादी संस्थानांना पाकिस्तानात जायचे होते. सिक्कीम या राज्याची १६ मे १९७५ ला स्थापना झाली. त्यापूर्वीचा सिक्कीमचा इतिहास फारच वैशिष्ट्यपूर्ण, राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीचा आणि भूप्रदेशीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. सिक्कीम हे तीन दिशांनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने संरक्षणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. सिक्कीमचा मध्ययुगीन इतिहास १७ व्या शतकात सुरू होतो असे मानले जाते. या कालावधीत ल्हात्सुन चेंपो या बौद्ध भिक्कुने तेथे धम्म प्रसार केला. १६४२ मध्ये फुन्सोक नामग्याल यांना पहिला चोग्याल (राजा) म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. याने नामग्याल वंशाची सुरुवात झाली. सिक्कीममध्ये सतराव्या शतकापर्यंत नामग्याल राजघराण्याची एकसत्ताक पद्धत रूढ होती. सिक्कीमच्या लोकसंख्येत लेप्चा, भूटिया आणि नंतर स्थलांतरित नेपाळी हे प्रमुख समुदाय होते. १७ व १८ व्या शतकात सिक्कीमचा नेपाळ आणि भूतानशी अनेक वेळा संघर्ष झाला. नेपाळ ...

“वैज्ञानिक दृष्टीकोन दिना”ची कुळकथा

इमेज
वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसाराचे उल्लेखनीय भरीव कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी "राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन" म्हणून अंमलात आणायचा असे ठरले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी झटत होते. इतकेच नव्हे तर त्यांनी असे कार्य करणारे हजारो लोक महाराष्ट्रात तयार केले. Original Photo From BBC News २०१८ साली २८ फेब्रुवारीला “राष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा करण्यात आला. विज्ञान दिवस म्हणजे विज्ञानाचे प्रयोग मांडणे, विज्ञानाची प्रगती सांगणे अशा प्रकारे सामान्यतः सगळीकडे तो साजरा केला जातो. त्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असलेल्या गोष्टी, उपचार त्या कार्यक्रमात केले जातात असेही आढळून आले. एका प्रतिथयश शाळेत अंधश्रद्धाळू कर्मकांडासह हा विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्याची बातमी फोटोसह "अंधश्रद्धा निर्मुलन" हे बिरूद लावलेल्या एका ग्रुपवर आयोजकांनी टाकली. त्यावर माझे आक्षेप मी स्पष्टपणे मांडले. परंतु त्यातील कर्मकांडाचे व अवैज्ञानिक उपचारांचे समर्थन स्युडो-सायंटिफिक कारणे देऊन आयोजक मंडळीतर्फे...

'गळी टुपणे' - हा दैवी चमत्कार नव्हेच!

इमेज
१७ एप्रिल १९९९ 'या जगातील कोणतेही चमत्कार हे दैवी नसतात. चमत्कार म्हणून गाजावाजा झालेल्या प्रत्येक घटनेमागे कोणते ना कोणते शास्त्रीय व भौतिक कारण असतेच. अशा तथाकथित चमत्कारांची खरी कारणे आपण समजून घेतली पाहिजेत आणि अंधश्रद्धाळू लोकांना समजावून दिली पाहिजेत.' फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन्सचे अध्यक्ष बी. प्रेमानंद तळमळीने बोलत होते. धर्मनिरपेक्ष मानवतावाद्यांच्या १४ व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात विविध देशांतून आलेले प्रतिनिधी त्यांचा शब्द न् शब्द अंतःकरणात साठवून ठेवत होते. या वेळी बी. प्रेमानंद व त्यांचे सहकारी विविध चमत्कारांची प्रात्यक्षिके दाखवून त्यामागील शास्त्रीय कारणांचे स्पष्टीकरणही देत होते. थोड्याच वेळात केरळ रॅशनलिस्ट असोसिएशन व तामीळनाडू रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी शर्ट व बनियन काढले. सर्वांची उत्सुकता ताणली गेली. पाठीत गळ खुपसून करण्यात येणाऱ्या चमत्कारांची प्रात्यक्षिके ते करून दाखवणार होते. प्रथम त्यांच्या छातीच्या व पोटाच्या त्वचेत सुई खुपसून दोऱ्याने ८-९ लिंबे शिवून लटकवण्यात आली. तसेच नास्तिकवादाचा पुरस्कर्ता पेरियार रामास्वामी या...

ही जमीन आधी कोणाची होती?

इमेज
Mother Earth Image from Wikimedia CCA एक राज्य होते. तिथे एक राजा राज्य करीत होता. राज्यात सर्व आलबेल होते. सर्व जाती-धर्माचे लोक एक दुसऱ्याशी मिळून मिसळून राहत असायचे. एके दिवशी दरबार भरलेला असताना एक अहमद नावाचा माणूस राजाकडे तक्रार घेऊन आला. तो म्हणाला,” राजेसाहेब, विक्टर नावाचा एक माणूस माझे घर व भोवतालची शेतजमीन बळकावून राहतो आहे. तरी राजे साहेबांनी माझे ते घर व जमीन मला देऊन मला न्याय मिळवून द्यावा.” राजाने त्या विक्टर नावाच्या माणसाला लागलीच बोलावणे धाडले. विक्टर राजदरबारात आल्यानंतर राजाने त्याला विचारले, “ हे सभ्य माणसा, तू अहमद नावाच्या माणसाचे घर बळकावले असा त्याचा आरोप आहे. हा आरोप तुला मान्य आहे का?” विक्टर म्हणाला, “ नाही राजेसाहेब. हे घर सुमारे दीडशे वर्षे आमच्या पूर्वजांच्या ताब्यात आहे. वंशपरंपरागत आम्ही या घरात राहत आहोत. राजसाहेब, आमच्या पूर्वजांनी हे घर व जमीन बळकावले नाही, तर रीतसरपणे विकत घेतले होते. त्यामुळे आमच्या पूर्वजांची ही संपत्ती झाली.” तर राजा म्हणाला, “ हे घर विकत घेतले होते, याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे?” विक्टर म्हणाला, “ हे घर विकत घेतल्याची काग...

"कैरो ६७८ " सार्वजनिक ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळाच्या विरोधातील चित्रपट

इमेज
आंतरराष्ट्रीय पातळीवर "कैरो 678" ने लैंगिक छळाविरुद्ध जागतिक चर्चेत भर घातली. यामुळे इतर देशांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर विचारमंथन होऊ लागले. चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने समाजाच्या विविध स्तरांवर चर्चा घडवून आणली. नुकताच “कैरो ६७८” हा चित्रपट बघितला. काही गोष्टी करायच्या राहून जातात तसा गेली १५ वर्षे हा चित्रपट बघायचे राहून गेले होते. “कैरो 678” हा इजिप्तमधील 2010 साली प्रदर्शित झालेला चित्रपट असून, त्याचे दिग्दर्शन आणि लेखन मुहम्मद दियाब यांनी केले आहे. हा चित्रपट लैंगिक अत्याचार, सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, आणि त्याविरुद्ध महिलांच्या संघर्षावर भाष्य करतो. चित्रपट सामाजिक आणि सांस्कृतिक दबावाला तोंड देत संघर्ष करणाऱ्या महिलांच्या धैर्याची प्रेरणादायी कथा सांगतो. चित्रपट तीन महिलांच्या कथा एकत्रितपणे सांगतो. त्या महिला इजिप्तच्या सामाजिक परिस्थितीशी सामना करत असतात. त्यांच्या जीवनात होणाऱ्या लैंगिक छाळावर आधारित त्यांचा लढा आणि संघर्ष यात दिसून येतात. 1. फैजा – ही गरीब आर्थिक परिस्थितीतून आलेली एक सामान्य गृहिणी आहे. टॅक्...

'हमाल' विद्यार्थ्यांची सुटका कधी?

इमेज
साधारण २५ वर्षापूर्वी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन अर्ध्या किलोच्या आसपास असे. आज ती वस्तुस्थिती नसून विनोद वाटण्याजोगी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर इतके ओझे असते, की ते 'हमाली' या वर्गवारीत मोडावे. या ओझ्यामुळे मुलांना पाठीचा कणा, मान, खांदेदुखी इत्यादी समस्या येतात. या ओझ्याविषयी पालक, शिक्षक, राजकारणी, सरकार, शिक्षणतज्ज्ञ झाडून सारे चिंता व्यक्त करतात. परंतु, त्यावर उपाय मात्र होत नाहीत. खरेतर या ओझ्याला जबाबदार आहे, आजची पाठांतर आणि गुणांवर आधारित शिक्षणपद्धती! पुस्तके, गाइड यातील माहिती वह्यांमध्ये कॉपी करायची, नंतर डोक्यात कोंबायची, सरतेशेवटी परीक्षेत ओकायची असा शिक्षणाचा आकृतिबंध झाला आहे. नवीन सर्वकष मूल्यमापनाची पद्धती अजून शिक्षकवर्गाला पचली नाहीय; पालक व विद्यार्थी यांचे अज्ञान तर विचारायलाच नको, मग नव्या बाटलीत जुनाच सोमरस भरल्याप्रमाणे नव्या प्रणालीत जुनीच औपचारिकता भरून वर्गाच्या पाट्या टाकल्या जात आहेत. त्यातून प्रत्येक विषयाला दोन-तीन वह्या, अभ्यासपुस्तिका (वर्कबुक्स), गाइड, नोट्स, शाळेच्या वह्यांसोबत ट्यूशनच्या वह्या, खासगी प्रक...

मोठ्या समस्या, साधे उपाय

इमेज
एका दर्जेदार साबणाच्या कंपनीत नवीच समस्या निर्माण झाली. साबणाच्या दुकानदारांकडून गंभीर तक्रार आली. साबणाच्या मोठ्या खोक्यात पॅक केलेल्या साबणाचे काही डबे रिकामे असलेले आढळून येऊ लागले. कंपनी ग्राहकांशी चिटिंग करते, 144 साबणाच्या खोक्यात एक दोन छोट्या डब्यात साबणच ठेवत नाही, असे आरोप झाले. वास्तविकत: सर्व साबण आटोमॅटिक पद्धतीने पॅक केले जात. कोणी व्यक्ती मुद्दामहून बदमाशी करण्याची शक्यता नव्हती. सर्व शक्यता पडताळून पाहिल्यावर कंपनीच्या व्यवस्थापकांच्या लक्षात आले की, दोष मशीनचा आहे. काही कागदी डब्यांत साबण भरायचे राहून जाते. कंपनीने बऱ्याच तज्ज्ञांचा सल्ला घेतला. आकाश पातळ एक केले पण समस्या काही जात नव्हती. शेवटी पॅकिंग साठी दुसरी मशिनरी बसवण्याचे कंपनीने ठरवले. तेव्हा तेथील एका सफाई कामगाराने मॅनेजरला विचारले,"साहेब, जरा मी सांगतो तसं करून बघता काय?" साहेबांनी कपाळावर आठ्या आणून विचार केला,"जगप्रसिद्ध तज्ज्ञांनी जिथे हात टेकले तिथे हा अनपढ काय करणार? पण मशिनरी बदलायची आहेच, तेव्हा बघू या हा काय तीर मारतो ते!" आणि त्यांनी त्याला प्रयोग करायला संमती दिली. त्याने एक मो...