सिक्कीमच्या भारत प्रवेशाची थरारक कहाणी, १६ मे १९७५ ला सिक्कीम स्थापना दिवस

भारत १९४७ साली स्वतंत्र झाला; परंतु सर्व राज्ये, संस्थाने त्यावेळी भारतात सामील झाली नाहीत. जम्मू काश्मीर, हैदराबाद, त्रावणकोर यासारख्या राज्यांना स्वतंत्र देश व्हायचे होते. भोपाळ, जुनागढ इत्यादी संस्थानांना पाकिस्तानात जायचे होते. सिक्कीम या राज्याची १६ मे १९७५ ला स्थापना झाली. त्यापूर्वीचा सिक्कीमचा इतिहास फारच वैशिष्ट्यपूर्ण, राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीचा आणि भूप्रदेशीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. सिक्कीम हे तीन दिशांनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने संरक्षणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. सिक्कीमचा मध्ययुगीन इतिहास १७ व्या शतकात सुरू होतो असे मानले जाते. या कालावधीत ल्हात्सुन चेंपो या बौद्ध भिक्कुने तेथे धम्म प्रसार केला. १६४२ मध्ये फुन्सोक नामग्याल यांना पहिला चोग्याल (राजा) म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. याने नामग्याल वंशाची सुरुवात झाली. सिक्कीममध्ये सतराव्या शतकापर्यंत नामग्याल राजघराण्याची एकसत्ताक पद्धत रूढ होती. सिक्कीमच्या लोकसंख्येत लेप्चा, भूटिया आणि नंतर स्थलांतरित नेपाळी हे प्रमुख समुदाय होते. १७ व १८ व्या शतकात सिक्कीमचा नेपाळ आणि भूतानशी अनेक वेळा संघर्ष झाला. नेपाळ ...